54 नव्याने पॉझिटिव्ह ; 2 मृत्यू
आतापर्यंत 20,183 बाधित झाले बरे
उपचार घेत असलेले बाधित 801
चंद्रपूर, दि. 13 डिसेंबर : गत 24 तासात जिल्ह्यातील 92 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तर 54 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 320 वर पोहोचली आहे.
तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 183 झाली आहे.
सध्या 801 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 60 हजार 416 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 36 हजार 964 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपुर शहरातील 49 वर्षीय पुरूष व
भद्रावती शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 336 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 309,
तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 54 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 18,
चंद्रपूर तालुक्यातील नऊ,
बल्लारपुर दोन,
भद्रावती चार,
नागभीड दोन,
मुल दोन,
सावली एक,
गोंडपीपरी दोन,
राजुरा एक,
चिमुर पाच,
वरोरा एक,
कोरपना तीन,
जीवती एक तसेच
इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.