212 पॉझिटिव्ह ; 02 मृत्यू
आतापर्यंत 24,542 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 1742
चंद्रपूर, दि. 26 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 125 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 125 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 701 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 542 झाली आहे. सध्या 1742 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 65 हजार 962 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 34 हजार 501 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये पंचशील वार्ड, गोंडपिपरी येथील 56 वर्षीय पुरूष व
म्हाडा कॉलनी येथील 82 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 417 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 378, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 212 रुग्णांमध्ये
चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 70,
चंद्रपूर तालुका 14,
बल्लारपूर 13,
भद्रावती 18,
ब्रम्हपुरी चार,
नागभिड 12,
सिंदेवाही सहा,
मूल नऊ,
सावली तीन,
गोंडपिपरी एक,
राजूरा 16,
चिमूर 17,
वरोरा 23,
कोरपना चार
व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.